काल्पनिक भयकथा
बिननावाचीगोष्ट... (भाग ~1)
नेहमी प्रमाणे त्यांचं आजही कुठ फिरायला जायच यावर एकमत होत नव्हतं.. पुण्यात जे काही Couples Points होते ते सगळे पालथे घालून झाले होते..अगदी शनिवार वाड्यापासून ते सारसबाग पर्यन्त.
शेवटी त्यातल्या त्यात जरा निवांत म्हणून ते तळजाई टेकडी वर जायला निघाले..
मेघा आणि मयूर कॉलेज मधून असल्या पासूनची मैत्री..
आणि बालपनापासूनचे मित्र मैत्रीण...शेजारी शेजारी राहात असल्याने दोन्ही घरांमध्ये ही एकोपा होता..
वयात आल्यापासून सगळेच त्या दोघांना म्हणायचे तुमच्या दोघांचा जोडा शोभून दिसेल..हाच धागा पकडून त्यांच्या मैत्रीच्या नात्याला त्यांच्या घरच्यांनी लग्नाच्या गाठित बांधायचा निर्णय घेतला होता.. साखरपुडा होऊन बराच काळ झाला होता. दोघांच् कॉलेजच शेवटच वर्ष होतं ते झाल की घरचे त्यांच्या लग्नाचा बार उडउन देणार होते..
पण तरुण वय सळसळत रक्त नव्याने उमलु पाहणाऱ्या नात्यात चोरून होणाऱ्या भेटी गाठी कशा थांबणार?
आजही असेच ते भेटत होते..फुलपाखरी दिवस होते हे त्यांचे...
मेघा ला Selfy च भयानक वेड होत..बसल्या बसल्या तीच तिथच सुरु झाल..
मावळतीकडे जाणारा सूर्य... घरटयाकडे उडनारि पाखरे..वाऱ्याने हलनारी झाडे..दूर कुठून तरी रानफुलांचा येत असलेला कडु गोड सुगंध... त्या सोबत उडनारा पाला पाचोळा...
फोटो काढताना वाऱ्या मुळे तिच्या केसांची उडनारी फजीती.. हे सर्व मयूर bike वर बसून हसत बघत होता.
नंतर त्याकडे लक्ष जाताच तिने स्वतःची जीभ चावली आणि हसून त्याला पण बोलवले.
मग दोघे मिळून Selfy काढू लागले..त्यासाठी चांगले Background शोधत शोधत ते वाडेकरांच्या बंद पडलेल्या बंगल्यात येऊन पोहोचले..
अर्धवट तुटक मुटक रंग उडालेल कंपाउंड..चरे पडलेल्या भग्न भिंती...फुटक्या दारूच्या बाटल्या...
आजुबाजूला वाढलेले खुरटे जंगली गवत..
प्लास्टिकचा केर कचरा...
वाकवलेल्या गजांच्या फुटलेल्या काचांच्या खिडक्या..
पश्चिमेकडे अस्ताला जात असलेला सूर्यनारायण..त्यामुळे पसरलेली गूढ संध्याकाळ..आणि त्या मागोमाग येणारी अंधारी रात्र..
आणि यात सोबत होतं त्या निष्प्राण बंगल्यावर झेपावनार एक पिंम्पळाच झाड...
अस एकंदरित ते दृश्य होत..
फोटो काढन्याच्या नादात ते बंगल्याच्या 1st फ्लोवर वर कसे पोहोचले हे त्यांच त्यांना पण कळल नाही...
त्यांच पाऊल बंगल्यात पडताच् तो एकाकी वाटनारा बंगला स्वतःशीच् खदखदून हसला होता..आज त्या ओसाड बंगल्याला त्याचा 31 वा बळी मिळणार होता..
त्या साठीच तर तो कुप्रसिद्ध होता...
जयवंत वाडेकर 1965 साली त्यानी तो बंगला बांधायला घेतला होता..पण एका एका जागेचा गुण असतो म्हणतात तेच खर... कोणत्या अशुभ मुहुर्ता वर त्याची पायाभरणी केली होती समजले नाही...
कितीतरी हळुवार स्वप्ने उराशी घेऊन त्या परिवाराने त्या बंगल्यात पाऊल टाकले होते...
अस म्हणतात की खुप आधी तिकडे एक वस्ती होती...त्यावर मध्यरात्री दरोडा पडला..दरोद्यात् जास्त लूट न मिळाल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी म्हातारे-कोतारे, पुरुष बापये,पोरं, आया बाया ,लेकी-सुना,लहान पोर कुणाचीही तमा न बाळगता अमानुषपने सगळ्यांना कापून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांना तिकडच पुरण्यात आलं असा काहीसा त्या जागेचा काळा इतिहास होता..
हे जयवंत रावांना माहीत नव्हतं..तळजाई च्या टेकडी वरुन समोरचे दरितले विहंगम दृश्य रोज सकाळी दिसावे हाच निर्भेळ हेतु त्यांचा होता...पण नियतीने त्यांच्या प्रांक्तानात अघटित लिहिले होते...
घरात प्रवेश करताच काही दिवसांनी त्यांचा 8 वर्षाचा नातू वरुन खाली पडून मेला...
अजुन थोड्या दिवसांनी त्यांची सहचारिणी ही अल्पशा आजाराचे निदान होऊन देवाघरी गेली..
वडिलांना ,भावाला- वहिनीला धीर देन्यासाठी माहेरी आलेली त्यांची गर्भवती मुलगी जिन्यातून पाय घसरण्याचे निमित्त होऊन तिच्या बाळासोबत देवाघरी गेली...
मृत्यूचे हे थैमान त्या घरात चालूच होते..
घरातील वास्तुपुरुष जणू लोप पावला होता...
त्यांच्या मुला आणि सुनेला तिकडे रहाणे ही नको वाटत होते..शेवटी ते तिघे त्या घरातील कटु आठवणीं पासून सुटका मिळवन्यासाठी दुसरीकडे रहायला जायचे ठरवतात...पण नियतीचे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नसते...त्या घराला याची कुनकुन लागून का होईना..
विपरीत घडते..जयवंत रावांची सुन आणि मुलगा अंगनातल्या पिंपळाच्या झाडाला फास लाउन घेतात..
स्वतःच्या वंशाची एका एकी अशी झालेली वाताहत बघुन जयवंत राव घराच्या उंबऱ्यातच जीव सोडतात...
सगळे लोक हळहळतात एका चांगल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झालेला असतो..
तेव्हा पासून तो बंगला वारसा हक्काने कुणाच्या ना कुणाच्या ताब्यात जात होता. पण काहीतरी वाईट घडून पुन्हा रीता होत होता..जणू खोल तळ नसलेल्या विहिरी सारखा ..
शेवटी शेवटी तिकडे एक वृद्धाश्रम सुरु करण्यात आले. घराची नव्यानी डागडुजी केली. पण हाय..!!!
राहायला आलेल्या वृद्धानच्या अंगावर त्याचा Slab कोसळून सगळे जागीच ठार झाले.
आणि तेव्हा पासून तिकडे भटक कुत्र..वाट चुकलेला वाटसरू..चेंडू आनायला गेलेली लहान मुले कोणीही परत आले नव्हते..असे 30 जन तरी त्यात आता पर्यन्त मेले असतील..
आणि अशा बंगल्यात आज त्या दोन अजान जीवांनी प्रवेश केलता...